शरद राव यांची मागणी

रिक्षांचे किमान भाडे २५ रुपये करण्यात यावे, फेरीवाल्यांना परवाने देऊन त्याच जागी त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची थकित देणी तात्काळ देण्यात यावीत या मागण्यांसाठी पालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षाचालक, बेस्ट कर्मचारी अशा पाच लाख कामगारांचा विविध मागण्यांसाठी १२ जून रोजी राणीबाग ते आझाद मैदान असा ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे.

याशिवाय १८ ते २० जून दरम्यान आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची घोषणा शरद राव यांनी केली आहे.