मालाडच्या जलायशाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३०वर पोहोचला आहे.  अभिजीत गाडे (२४) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. उपचारासाठी त्याला नायर रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला आहे हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  तो नोकरीसाठी मालाड येथे काकांकडे राहण्यास आला होता.