CAA, NRC विरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात एकूण ६५ संघटना सहभागी झाल्या आहेत. संविधान बचाओ, भारत बचाओ अशा घोषणा देत मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला आहे. फक्त मुसलमानच नाही तर इतर धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. CAA, NRC आणि NPR ला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलनत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

साधारण महिना ते दीड महिन्यापासून देशभरात CAA, NRC विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही CAA, NRC ला समर्थन देण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा आयोजित केला होता. आता आज मुंबईतील आझाद मैदानात CAA विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये फक्त मुसलमान संघटनांचाच नाही तर इतर संघटनांचाही सहभाग आहे.