पश्चिम रेल्वेवर अंधेरी आणि विलेपार्ले या स्थानकांदरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली असली, तरी या आणीबाणीच्या प्रसंगी मेट्रोने मात्र मुंबईकरांना चांगलाच हात दिला. अंधेरी स्थानकात अडकलेल्या हजारो प्रवाशांना घाटकोपपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे काम मंगळवारी मेट्रोने केले. या अपघाताच्या दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या २० हजारांनी वाढली. विशेष म्हणजे बेस्टप्रमाणे मेट्रोनेही या दिवशी वर्सोवा ते घाटकोपर यादरम्यान विशेष फेऱ्या चालवत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.