मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे  स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करून केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून त्याप्रमाणेच ते नागरिकांचे शोषण करीत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी के ली.

आता भाजप गप्प का- तपासे

केंद्रात यूपीए सरकार असताना एक रुपयांनी पेट्रोल-डिझेल महाग झाले तर आकांडतांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का, असा सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.