मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या आजपासून(दि.१६) दुप्पट होत आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी मुंबई विमानतळावरुन दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण विमानसेवा बंद करण्यात आली होती. पण २४ मे रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ५० विमाने ये-जा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विमानतळावर आजपासून ५० विमानांचे आगमन व ५० विमानांचे उड्डाण होईल.

Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?


मुंबईतून सध्या देशाच्या विविध पंधरा सेक्टरमध्ये देशांतर्गत हवाई प्रवास सुरू आहे. लवकरच त्यामध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. लॉकडाउन लागू होण्याआधी मुंबई एअरपोर्टवरुन दररोज सुमारे १००० विमानांची (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) वाहतूक व्हायची. तर, आता दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक होईल.