भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या घाटकोपरमध्ये आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी आपल्याला तसंच महिलेचा पती आणि इतरांना अटक करण्यात आली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली. महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दुपारी १२ वाजता घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी १२ दिवसांनंतर अद्यापही एफआयआर दाखल केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला होता. महिलेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मृत्यूला १३ दिवस झाले तरी FIR का नोंदविली गेला नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे. शीतल दामाला न्याय मिळण्यासाठी FIR रजिस्टर करण्याचा आग्रह करणाऱ्या शीतल दामा यांचा 11 वर्षांचा मुलगा जय, पती जितेश व मला आणि इतरांना पोलिसांनी अटक केली. 100 निदर्शकांनी पोलिस आणि महापालिकेला प्रश्न विचारला, "शीतल दामाच्या मृत्यूला 13 दिवस झाले तरी FIR का नोंदविली गेली नाही?" pic.twitter.com/4BGmwrvigk — Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2020 "शितल दामा चा परिवाराला न्याय हवा" आज दुपारी १२ वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशन चा बाहेर, शीतल चा परिवार सोबत मी धरणा/ ठिय्या आंदोलन करणार. पोलीसांनी १२ दिवसा नंतर ही एफ आय आर FIR ही रजिस्टर केला नाही @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/GNKiQPfMoI — Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2020 "पोलीस एफआयआर दाखल करण्यास नकार देत असून ३३ मुद्यांची यादी तयार केली आहे. तपासासाठी कित्येक आठवडे लागतील," असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं असून पालिका कंत्राटदार माफियांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? अशी विचारणाही केली आहे. Sheetal Dama Death. Police says FIR can't be registered. Now they prepared list of 33 points, inquiry will take weeks. BMC team declare their findings on 1st day that "She evaporated in Air at Asalfa & Her Deadbody appeared at Worli Nala. Is it to Protect BMC Contractor Mafias!? — Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2020 काय आहे प्रकरण घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल (३२) गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण एक तास होऊन गेला तरी त्या न परतल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केल असता पिठासाठी नेलेली पिशवी कुटुंबाला. त्याजवळच बंदिस्त नाला होता आणि त्यावरील काँक्रीटचे झाकण उचकटले होते. त्याच सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. असल्फा येथील छोटय़ा नाल्यात पडल्यानंतर मानवी मृतदेह वरळी-हाजीअलीपर्यंत वाहून येऊच शकत नाही, असे निरीक्षण महापालिका अधिकाऱ्यांनी नोंदवल्यानंतर शीतल यांच्यावर नेमका काय प्रसंग बेतला, त्यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट करणे पोलिसांसाठीही आव्हान ठरत आहे.