मुंबईतल्या लोकल अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. महिलांना १७ ऑक्टोबरपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवास करता येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबत अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सामान्यांसाठी लोकलची दारं कधी उघडणार हा प्रश्न कायम आहे. अशात लोकसत्ता ऑनलाइनने मुंबईकरांनाच हा प्रश्न विचारला तेव्हा सरकारवर चिडलेल्या जनतेने आता पुरे झाले बसचे धक्के, लोकल सुरु करा अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. मुंबईकर काय म्हणतात पाहा व्हिडीओ