अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं दिलासा दिला आहे. १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी, वेळेच्या बंधनामुळे अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. जाणून घेऊया लोकांच्या भावना.