राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, ही भेट राजकीय नसून वैयक्तिक कारणांसाठी होती, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांना दिली. आव्हाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मी माझ्या वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यांच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारली. राज हे अभ्यासू आहेत. त्यांच्याबरोबर बोलताना अनेक विषयांची माहिती झाली. भेटीमागे कोणताच राजकीय हेतू नव्हता. भविष्यात महाराष्ट्रासमोर असलेल्या अडचणी, नुकताच झालेल्या नाट्यसंमेलनातील भाषणाबाबत चांगली चर्चा झाली. त्यामुळे भेटीमागचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असेही ते म्हणाले.