अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचे प्रकरण सध्या सरकारच्या पातळीवर प्रलंबित असतानाच दुष्काळ व अन्य प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकारला पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादीने प्रथमच मुख्यमंत्र्यांशी औपचारिक पातळीवर चर्चा केली. कापूस, ऊस, सोयाबीन, द्राक्षे, सोयाबीन, साखर या उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. शेतकऱ्यांना मदत करावी व  पॅकेज देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.