मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. स्वबळावर लढायचे की कोणाशी आघाडी करायची याबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  जाहीर के ले. काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही परिस्थितीनुसार निर्णयाची भूमिका जाहीर करत प्रत्येक ठिकाणी आघाडी नसेल हे स्पष्ट के ले.  या निवडणुकांत स्थानिक राजकीय परिस्थिती महत्त्वाची असते.  सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे मलिक यांनी सांगितले.