विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जाताना भाजप-शिवसेना सरकारचा पुरता गोंधळ उडाल्याचे समोर आले, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जनतेचा कोणताही प्रश्न सरकार मार्गी लावू शकले नाही, असा आरोप त्यांनी केला. तर, सरकारने आव्हान स्वीकारून जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली.