मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू  राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करून  परिपूर्ण आराखडा तयार करावा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  मोठ्या कंपन्यांनी  कामगारांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था उद्योगाच्या आवारात करावी व ज्यांना हे  शक्य नाही, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी  परिसरात ही व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे, कामगारांच्या वाहतुकीतही मदत करावी, असे ते म्हणाले.