मुलुंड येथील सराफाच्या दुकानातील सुमारे तीन कोटी रुपयांचे दागिने लुटणाऱ्या झारखंडच्या टोळीतील तिघांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीने दुकानासमोर आंबे आणि नारळ विक्रीचे दुकान उघडून दुकानावर पाळत ठेवली होती. ‘सीसीटीव्ही’त तिघेजण चोरी करताना दिसत असले तरी त्यांचे चेहरे झाकलेले होते. घाटकोपर पोलीस आणि गुन्हे शाखा या आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्हे शाखा ७ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून चार जणांना अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे.याबाबत माहिती देताना सहपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, सदर टोळी झारखंडची आहे. दुकान कधी बंद होते, दुकानात प्रवेश करण्याचे मार्ग कोणते याचा त्यांनी अभ्यास केला आणि ही चोरी केली.