प्रत्युषाच्या आईचे पोलीस तपासावर पत्रातून प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांना सूचना
प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येचा तपास गुन्हे शाखेकडे देण्याचे संकेत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत. मुंबई पोलिसांना प्रत्युषाच्या आत्महत्येचा तपास अग्रक्रमाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस तपास योग्यप्रकारे करत नसतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मी स्वत पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास त्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्युषाच्या आईने मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना तपासाविषयी असमाधान व्यक्त करत गुन्हे शाखेकडून तपास करण्याची विनंती केली होती.
बालिकावधूफेम प्रत्युषा बॅनर्जीे १ एप्रिल रोजी गोरेगावच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या गुन्ह्य़ाचा तपास बांगूरनगर पोलीस करत असून प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, गुन्हा दाखल झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या राहुलने उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला. प्रत्युषाच्या आत्महत्येला राहुलच जबाबदार असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी सोमा बॅनर्जी यांनी बुधवार, १३ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र लिहून केली. राहुलने केवळ माझ्या मुलीलाच फसवले नाही तर त्याने अनेक मुलींना पैशांसाठी फसविले आहे. बांगूरनगर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोमा यांनी पोलिसांनी राहुलला पुरावे नष्ट करण्याची संधी दिली, आताही तो आम्हाला आणि साक्षीदारांना धमकावत असून दुसरीकडे पोलिसांचा तपास थंडपणे सुरू आहे, त्यामुळे या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली होती. या पत्राविषयी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारले असता, सोमा बॅनर्जी यांचे पत्र आम्हाला मिळाले असून, पोलिसांना योग्यप्रकारे तपास करण्याच्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास तपास गुन्हे शाखेकडेही वर्ग करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही