काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी काही चांगल्या सूचना दिल्या तर त्या स्वीकारण्याची आमची तयारीच आहे. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन राजकारण करु नये असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राहुल गांधी विदर्भात आले, हे चांगलेच आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काही चांगल्या सूचना केल्यास त्या जरुर स्वीकारल्या जातील. पण केवळ राजकारण केले, तर त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.