मुंबई : अकरावी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी नव्याने संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशीच दोन लाख एक हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. आधीचे दोन लाख ९० हजार असे मिळून एकूण पाच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज भरून झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अकरावी प्रवेशपरीक्षेच्या नोंदणीसाठी २० जुलैपासून संकेतस्थळ सुरू केले. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. हीच परिस्थिती दुसऱ्या दिवशीही राहिल्याने अखेर राज्य मंडळाने हे संकेतस्थळ तात्पुरते काही कालावधीसाठी बंद केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration started for the eleventh admission process zws
First published on: 27-07-2021 at 03:35 IST