राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले असल्याची घणघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. गुजरातमधील मुस्लिमांपेक्षा पाकिस्तानात हिंदू अधिक सुरक्षित - हाफिज सईदशिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातून उध्दव यांनी फेसबुकवरील महापुरूषांच्या विटंबना प्रकरणावरील शरद पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. दिल्लीत मोदी सरदार आल्यामुळे महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होण्यास सुरूवात झाली असल्याचे वादग्रस्त विधान पवार यांनी केले होते. याच्या प्रत्युत्तरात उध्दव यांनी शरद पवार हे कधी काय बोलतील याचा नेम नाही. महाराष्ट्रतील दारूण पराभवानंतर त्यांचा ताळतंत्र सुटला आहे. ते देखील मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या हाफीज सईदसारखे काहीही बरळू लागलेत असा प्रतिहल्ला उध्दव यांनी चढवला आहे. तसेच पुण्यात वर्षभरापूर्वी नरेंद्र दाभोलकरांची हत्या दिवसाढवळ्या झाली व तेव्हा मोदी यांचे सरकार दिल्लीत नव्हते, पण पवारांच्या सरकारला दाभोलकरांचे मारेकरी अद्याप शोधता आलेले नाहीत. या गोष्टीचे पवार यांना विस्मरण झाले की काय? असा सवालही उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.