मुलुंड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मुंबईहून ठाण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. घरी परतण्याच्या ऐन वेळी मध्य रेल्वेच्या या रडगाण्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडणींना सामोरे जावे लागत आहे. विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱया धीम्या मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद गती मार्गावर वळविण्यात आल्याने ताण वाढला आहे. यामुळे प्रवाशांना रडतखडत प्रवास करावा लागत आहे. तर, प्रवाशांच्या गर्दीमुळे स्थानकांवर गोंधळाचे वातावरण आहे.