दमणगंगा िपजाळ जोडप्रकल्प आणि पार-तापी नर्मदा जोड प्रकल्प म्हणजे ‘नार-पार’ प्रकल्पातून गुजरातला जाणारे पाणी रोखावे आणि ते मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व मुंबईला मिळावे. त्यासाठी गुजरात सरकारबरोबर आणि केंद्राबरोबर केलेला सहमतीचा करार मोडीत काढून राज्यातील जनतेला पाणी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली.सुमारे १३५ टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पातून मुंबईसाठी २० टीएमसी पाणी मिळणार आहे. बरेचसे पाणी गुजरातच्याच वाटय़ाला असून २०१० मध्ये राज्य सरकारने यासंदर्भात करार केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आधीच्या सरकारला दोष देऊन चालणार नाही, त्यांचे चुकले असेल तर तुम्ही आता तो करार मोडीत काढावा.