देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या मंगळवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहराला २१० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असतो. या योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते बुधवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ असा २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल.
एमआयडीसी तसेच ‘स्टेम’ प्राधिकरणाकडून मिळणारे पाणी सुरु  रहाणार असल्याने कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातील पाणी पुरवठा नियमित सुरु राहीले, असे पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रभावित क्षेत्रे
ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिध्देश्वर, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगांव रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकुजिनीवाडी, विजयनगरी, घोडबंदर रोड व खारटन रोड