ठाणे-वाशी दरम्यान गणपती पाडा येथे लोकलचे दोन डब्बे रुळावरुन घसरल्याचे वृत्त आहे. यामुळे मुंबई-ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, लोकलमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. मध्य रेल्वेने याबाबत ट्विट केले आहे.

मध्य रेल्वेच्या ट्विटनुसार, ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे ठाणे आणि ऐरोली दरम्यान रुळावरुन घसरले. या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांना कसलीलीही इजा झालेली नाही. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या डब्यांना रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत.