भारतीय जनता पार्टी हा पक्ष गर्विष्ठ पक्ष बनला आहे. मात्र, आता या भाजपाच्या शेवटाला सुरुवात झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. आज दिवसभरात झालेल्या राज्यातील राजकीय ड्राम्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. Nawab Malik,NCP: Sharad Pawar saheb had said that Uddhav ji will be the Chief Minister and Uddhav ji has also agreed to this — ANI (@ANI) November 26, 2019 बहुमत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिक यांनी टीका केली. तसेच महाविकास आघाडी दीर्घकाळ टिकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले असून स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील हे मान्य केल्याचे सांगितले. Nawab Malik,NCP: Shiv Sena was not born to do communal politics , they came into existence to serve the people of Maharashtra. Shiv Sena was spoiled after joining hand with BJP pic.twitter.com/n4LPqqlaOo — ANI (@ANI) November 26, 2019 शिवसेनेचा जन्म हा जातीयवादी राजकारण करण्यासाठी झालेला नाही. तर महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी शिवसेना स्थापन झाली. उलट भाजपासोबत हातमिळवणी केल्याने शिवसेनेची फरपट झाली.