मुंबईत अंधेरी उड्डाणपूलावर बुधवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. तीन कार परस्परांवर आदळल्या. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात घडला.

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. सायनमध्येही रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे