कणकवली तालुक्यातील कासार्डे ब्राह्मणवाडी येथील हायवेवर आरामबस आणि व्हॅगन आर यांच्यात झालेल्या अपघातात आई-वडील आणि मुलगी जागीच ठार झाले. ते जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील आहेत.
मुंबई येथून निघालेली जय गणराज बस आणि खारेपाटणच्या दिशेने जाणारी व्हॅगन आर गाडी यांचा कासार्डे ब्राह्मणवाडी येथे अपघात झाला. भरणी घाडीवाडी येथून मुंबई, जोगेश्वरी पूर्व येथे व्हॅगनआर ही गाडी भरधाव वेगात जात होती.या भीषण अपघातात गणेश शामसुंदर पाडावे (३८), सायली गणेश पाडावे (३७) व वेदश्री गणेश पाडावे (१७) हे जागीच ठार झाले. हा अपघात दुपारी झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.