महाराष्ट्र दिन आणि महिना अखेरीस जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर फिरायला जाण्याकडे प्रवाशांचा कल असतो. याचाच परिणाम मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळतो आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोलनाक्यावर सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. या वाहतूक कोंडीमुळे निश्चितच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.