मुंबई: आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही करोनाचे सावट कायम आहे. करोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील दहा पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार आहे.

करोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० प्रमुख पालख्या एसटीच्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी एसटीच्या गाड्या पालख्यांसह पंढरपूरकडे रवाना होतील.