साताऱ्यात भाऊबीज साजरी करून मुंबईकडे परतत असलेल्या पाचजणांच्या गाडीला भरधाव ट्रकने बुधवारी पहाटे पाच वाजता जोरदार धडक दिल्याने कारमधील शिरीष जाधव, साईकेत जाधव, धनंजय भोसले हे तिघे जागीच ठार झाले, तर कारचालक महेश मोरे आणि सहप्रवाशी कैलास जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. ट्रकचालकाने ऐनवेळी मार्गिका बदलल्याने हा अपघात झाला असून ट्रकचालक किस्मत अली याला पोलिसांनी अटक केली आहे.