अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतर कंगना पहिल्यांदाच मुंबईत परतली. मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेला डिवचणाऱ्या कंगनाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असा मिश्किल सवाल करत उर्मिला यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ, असा सवाल केला. उर्मिला यांनी याआधीही कंगनावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे त्यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. “for standing up for my beloved city Mumbai “ बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ. — Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020 आणखी वाचा : “मला मुंबईत राहण्यासाठी केवळ त्याच्या परवानगीची गरज…”; कंगनाचा टोला कंगना रणौतने मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत तिने शिवसेनेला टोला लगावला.