राज्यातील २४ टोलनाके बंद करण्याची शिफारस शासकीय समितीने दोन वर्षांपूर्वी करूनही मुख्यमंत्र्यांनी काय केले, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे.
 तसेच सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना देण्यात येणारा प्रत्येकी १० कोटी रुपयांचा विकास निधी परत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास सुमारे १६०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील आणि अनेक टोलनाके बंद करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.