सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी सकाळी विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल दीड तासानंतर सुरू झाली आहे. मात्र, अजूनही वाहतूक धीम्या गतीनेच सुरू आहे. आज सकाळी अंधेरी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजले होते. यादरम्यान, रेल्वे ट्रॅक्सवर ट्रेन्सची रांग लागलेली पहायला मिळत होती. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.