विरार स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुर्ववत झालेली लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली. दरम्यान वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तब्बल 48 तासानंतर डहाणू-चर्चगेट वाहतूक सुरळीत झाली होती.