मुंबई : भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळू लागला असल्यामुळे मुंबईकरांवरील १५ टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणी कपात अजून काही दिवस सुरू राहण्याची शक्यता होती. ही दुरुस्ती अद्याप झालेली नसली तरी मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बिघाड दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्याय जल अभियंता विभाग तपासून पाहत होता. मात्र भातसा धरणातूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले आहे. दरम्यान, विद्युत केंद्रातील बिघाडाची दुरुस्ती करण्यात तांत्रिक अडचणी येत असून दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने केले आहे. 

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?