मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने मिशन मुंबई हाती घेतले आहे. त्यानुसार मुंबईचा कायापालट करण्यासाठी १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे शहराचे सौंदर्यीकरण करून  मुंबईचा कायापालट करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत.

मुंबई महापालिकेची  लवकरच निवडणूक होणार असून पालिकेतील ठाकरे गटाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातत्याने मुंबईतील सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला जात आहे. आजही  शिंदे आणि फडणवीस यांनी मुंबईत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या वेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते.  मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले.  मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नूतनीकरण, पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटिंग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती या वेळी देण्यात आली. त्यावर सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यांत वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाडय़ांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यांसारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अमलात आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
VAishali Darekar on shrikant shinde
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, “एकवेळ चौक कमी पडतील…”
Vanchit Bahujan Aghadi
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!

‘शहराचा कायापालट करा’

जी-२० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून त्यातील पहिल्या बैठका मुंबईत होणार आहे. हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडिंग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.