scorecardresearch

Premium

भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दोन सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले

ashish shelar
आशीष शेलार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अशा ४८ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्येकी एक सभा राज्यात होणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रवास करून सभाही घेणार आहेत. मोदी सरकारची विकासकामे व कल्याणकारी योजनांची माहिती महाजनसंपर्क अभियानातून ८० कोटी नागरिकांपर्यंत पोचविली जाणार आहे. देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि मतदान केंद्र (बूथ) स्तरावर आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी दिली.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

राज्यात प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघांचा एक विभाग करण्यात आला असून या मतदारसंघात राज्याचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी , उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, प्रल्हादसिंह पटेल, अजयकुमार मिश्रा, खासदार तीरथसिंह रावत , सदानंद गौडा , मध्य प्रदेशचे मंत्री अरिवद भदुरीया आदी नेते प्रवास करणार असल्याचे शेलार यांनी नमूद केले.

योजनांची तातडीने अंमलबजावणी

गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिल्यामुळे जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे. अपना परिवार अपना विकासह्ण हे धोरण बदलून सबका साथ, सबका विकासह्णचा नवा अध्याय रचला आहे. पूर्वी योजना व प्रकल्पांची केवळ घोषणा होत असे, मात्र अंमलबजावणी होत नव्हती. आता पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही एकाच सरकारच्या कालावधीत होत आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा १०० टक्के लाभ गरजूंपर्यंत पोचत आहे, असे शेलार यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 48 meetings in the state in bjp mahajan samparak campaign amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×