मुंबई : पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असला तरी मुंबईतील सुमारे ५० टक्के झाडांच्या फांद्यांची छाटणी अद्याप झालेली नाही. दरवर्षी पावसाळय़ात मुंबईत अतिवृष्टी व जोराच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडून, तसेच वृक्षाच्या फांद्या मोडून पडल्याने अपघात होतात. त्यामुळे पालिकेतर्फे रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. खासगी सोसायटय़ा, सरकारी संस्था यांच्या आवारातील झाडांची छाटणीही शिल्लक असून आठ हजारांहून अधिक संस्थांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत सुमारे २९ लाख झाडे असून त्यापैकी सुमारे १५ लाख झाडे खासगी भूखंडावर आहेत. दरवर्षी पावसाळय़ात झाडे किंवा झाडांच्या फांद्या कोसळून अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने दरवर्षी रस्त्यावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्याची छाटणी केली जाते. त्याकरिता दरवर्षी पालिकेतर्फे कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते. त्यासाठी वार्षिक ५० कोटींपर्यंत खर्च केला जातो. तर खासगी आवारातील झाडांची छाटणी नागरिकांना करवून घ्यावी लागते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 percent of the tree branches in mumbai have not been pruned yet zws
First published on: 19-05-2022 at 02:11 IST