मुंबई : राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार  सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मतमोजणी येत्या मंगळवारी  होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात ७ हजार १३५  ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.

Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Public holidays in constituencies on voting day
मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे – ३५, पालघर – ६२, रायगड – १९१, रत्नागिरी – १६३, सिंधुदुर्ग – २९१, नाशिक – १८८, धुळे – ११८, जळगाव – १२२, अहमदनगर – १९५, नंदुरबार – ११७, पुणे – १७६, सोलापूर – १६९, सातारा – २५९, सांगली – ४१६, कोल्हापूर – ५२९, औरंगाबाद – २०८, बीड – ७७१, नांदेड – १७०, उस्मानाबाद- १६५, परभणी – ११९, जालना – २५४, लातूर – ३३८, हिंगोली – ६१, अमरावती – २५२, अकोला – २६५, यवतमाळ – ९३, बुलडाणा – २६१, वाशीम – २८०, नागपूर – २३४, वर्धा – १११, चंद्रपूर – ५८, भंडारा – ३०४, गोंदिया – ३४५, गडचिरोली- २४. एकूण – ७१३५.