मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखेर राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील ७५ हजार घरे शोधून काढली असून पुढील सहा महिने ते दोन वर्षांत या घरांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध गिरणी कामगार संघटनांनी शोधून काढलेली ठाण्यातील ११० एकर जागा लवकरच कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ११० एकर भूखंडावर किमान ५० हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरण्यांच्या जमिनींवरील योजनेतील २५ हजार आणि ठाण्यातील ५० हजार घरे मिळून ७५ हजार कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता आहे. आता आणखी ७५ हजार कामगारांना घरे मिळणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75000 houses for mill workers in two years zws
First published on: 20-05-2022 at 02:25 IST