scorecardresearch

Premium

मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबईमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक करीत आहेत.

aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईमधील अनेक भागात कचऱ्याचे ढिग साचू लागले असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी तातडीने ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई: तस्करी प्रकरणात ३० वर्षांनी आरोपीला ताब्यात घेणे भोवले; अटकेचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

real estate agents, agricultural lands in uran, farmers in uran, agents forcing farmers to sell land in uran
उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर
sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब
cannabis gram Juna Andura
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…
Survey of sewage channels
पिंपरीतील सांडपाणी वाहिन्यांचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण

मुंबईमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. मुंबईमध्ये कोणत्याही भागात नियमित कचरा गोळा करण्याचे काम करण्यात येत नाही. मुंबईतील कचरा वेळीच उचलावा. नागरिकांच्या हितासाठी कारवाई करावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सध्या महानगरपालिका राज्य सरकारच्या बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांसाठी काम करीत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गेले वर्षभर मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत. महानगरपालिकेतील १५ सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांनी तक्रार कुठे करायची, असा सवाल त्यांनी पत्रात केला आहे. समाज माध्यमांवरील तक्रारीना तीच तीच उत्तरे मिळतात, प्रत्यक्षात कोणतेही काम होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aditya thackeray letter to bmc chief demand to disposed accumulated waste in city mumbai print news zws

First published on: 29-09-2023 at 22:09 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×