मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला समन्स बजावले आहेत. त्याला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपानंतर ‘ईडी’कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम एका व्यक्तीद्वारे संस्थेच्या खात्यात जमा केल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.