मुंबईः धारावीत बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला आहे. धारावी पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरूवारी प्राप्त झाला होता. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा यांना देण्यात आली. त्यांनी सर्व परिसरात तपासणी केली. त्यावेळी माहितीमध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर आरोपीविरोधात शनिवारी धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३५३(१), ३५३(३) गुन्हा दाखल केला. शांतता भंग करण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Marijuana worth six lakh rupees seized in Parbhani
परभणीत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
36 year old man attacked police officers at gadevi with stone on Thursday
बंदोबस्ताला तैनात पोलिसावर दगडाने हल्ला, पोलीस गंभीर जखमी
land acquisition news
वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला परस्पर वळवला; आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फसवणूक, गुन्हा दाखल
Maha Kumbh Mela Stampade
Maha Kumbh Mela Stampade : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागे कट? पोलिसांनी सुरू केली १६ मोबाइल क्रमांकांची चौकशी
mpsc group b exam paper and answer sheet leak offered for 40 lakh rupees
‘एलआयसी’ पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे गजाआड, मुंबई-पुणे रस्त्यावरील काॅलसेंटरवर छापा
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
mumbai dumpyard
मुंबई : देवनार कचराभूमी परिसरातील ३९ दिव्यांच्या खांबांची चोरी

हेही वाचा – ‘हर दिल मुंबई’चा नारा देत मुंबईकरांची पहाट, ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ स्पर्धेचा उत्साह शिगेला; यंदा २० वे वर्ष

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना शंभरहून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. त्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलणे करुन दिले नाही तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली होती. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केलानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. याशिवाय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका महिलेने ११० वेळा मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून खोटी माहिती दिली होती. अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवर विनाकारण ताण येतो.

हेही वाचा – सैफच्या हल्लेखोराला पकडायला किती पोलीस कामाला?

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणामध्ये खोटी माहिती प्रसारीत करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होता. त्यामुळे आरोपींना अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये कठोर कायदे करण्याची आवश्यकता असून त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader