scorecardresearch

Premium

“निरव मोदी, विजय मल्लयाप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होताच किरीट सोमय्या…”, काँग्रेसचा विक्रांत घोटाळ्यावरून गंभीर आरोप

इतरांवरील कारवाईच्या वेळी ‘कर नाही तर डर कशाला’ म्हणणारे किरीट सोमय्या स्वतःची वेळ आल्यावर कशाला घाबरत आहेत? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.

“निरव मोदी, विजय मल्लयाप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होताच किरीट सोमय्या…”, काँग्रेसचा विक्रांत घोटाळ्यावरून गंभीर आरोप

“आयएनएस ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या निधीसंदर्भात चौकशी सुरु असताना सोमय्या अचानक गायब झाले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला घाबरत आहेत? त्यांनीही चौकशीला सामोरे जावे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतिल लोंढे यांनी व्यक्त केले..

अतुल लोंढे म्हणाले, “किरीट सोमय्या यांच्या ‘विक्रांत बचाव’ निधी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. सोमय्या पिता पुत्र दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. असं असताना ते चौकशीला गेले नाहीत. दररोज विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वतःवर कारवाईची वेळ आली की गायब झाले, दोन दिवसांपासून ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

“भ्रष्टाचाराचे आरोप होताच सोमय्या देखील पळाले आहेत का?”

“‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली सोमय्या यांनी देशभावनेशी खेळ केला आहे. निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले तसेच सोमय्याही पळाले आहेत का? पळून जाण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे,” असं म्हणत अतुल लोंढे यांनी सोमय्यांना टोला लगावला.

“भाजपा आरोपींना वाचवण्यासाठी वंदे मातरम घोषणेचा वापर करतोय”

अतुल लोंढे म्हणाले, “भाजपाचे दुसरे नेते, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मुंबई बँकेतील घोटाळ्याप्रकणी रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीवेळी समर्थकांची गर्दी जमवून पोलीस स्टेशनबाहेर ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या गेल्या. ‘वंदे मातरम’ हे पवित्र शब्द आहेत. स्वातंत्र्यचळवळीत अनेक क्रांतीवीर व स्वातंत्र्यसैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. या पवित्र शब्दांचा वापर भाजपा आरोपींना वाचवण्यासाठी करत आहे हे दुर्दैवी आहे. तसेच तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे.”

हेही वाचा : “मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती, त्यामुळे…”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

“चौकशीपासून पळ काढणे कशासाठी?”

“महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, कायद्याच्या चौकटीत जे होईल त्याला सामोरे जावे. दोषी असतील, तर त्यांना शिक्षाही होईल. त्यासाठी दबाव आणणे, चौकशीपासून पळ काढणे हे कशासाठी?” असा सवाल अतुल लोंढे यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Atul londhe criticize kirit somaiya over ins vikrant corruption case pbs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×