लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत १५ ते २० मिनिटांच्या वारंवारतेने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
Ujani dam, desilt Ujani dam, Radhakrishna Vikhe Patil,
उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

बेस्ट उपक्रमाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाने ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत दररोज १५ ते २० मिनिटांच्या अंतराने दादर रेल्वे स्थानकावरून चैत्यभूमीवर जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबईच्या विविध भागामधून ४ डिसेंबर रोजी चैत्यभूमीसाठी बसमार्ग क्रमांक २४१, २००, ए-३५१, ३५४ वर बससेवा प्रवर्तित करण्यात येणार आहेत. ६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथून बसमार्ग क्रमांक सी-३३, ए१६४, २४१, सी ३०५, ए ३५१, ३५४, ए-३५७, ए ३८५, सी-४४०, सी ५२१ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहेत. जेणेकरून, नियमित प्रवासभाड्यात प्रवाशांना चैत्यभूमी येथे पोहचणे सहज शक्य होईल.

आणखी वाचा-अनुयायांच्या विश्रांतीसाठी रेल्वे स्थानकात सुविधा, एकाचवेळी १० हजार अनुयायी थांबण्याची व्यवस्था

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दैनंदिन बसपास ६० रुपये शुल्कात उपलब्ध करण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीसह मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या अनुयायांसाठी विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून सुरू होणारी बसफेरी पुन्हा उद्यानापर्यंत सहा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी ७.३०, सकाळी ८, सकाळी ८.३०, सकाळी ८, सकाळी ९, सकाळी १० या वेळेत फेऱ्या उपलब्ध असतील. याशिवाय विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी, तसेच अनुयायांच्या मार्गदर्शनासाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) परिसरामध्ये बसवाहक / बसनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय विभागामार्फत अनुयायांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि प्रथमोपचार आदींची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

Story img Loader