महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजुंनी तणाव निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण कुणी ‘अरे’ केल्यास आम्ही ‘कारे’ने प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी मांडली. कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री सातत्याने आक्रमक भूमिका घेत असताना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने एवढय़ा ठोक शब्दांत प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला असून मंत्र्यांना बेळगावला पाठवू नका, असे पत्र तिथल्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राला पाठविले आहे. यासंदर्भात प्रश्नांवर बोलताना शेलार म्हणाले, की कर्नाटक सीमाभागातील गावांवर महाराष्ट्राचा अधिकार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात आम्ही स्पष्ट भूमिका मांडली आहे. सीमाभागातील गावांमध्ये शिंदेदे सरकार अनेक योजना पोचविणार आहे. जत भागातील पाणी योजना पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar warning to karnataka regarding karnataka border issue amy
First published on: 04-12-2022 at 00:22 IST