मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दरोडा किंवा चोरीसाठी तडीपार नव्हते. कुख्यात दाऊद इब्राहिमच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास घडविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी यांच्या पोलीस चकमकीप्रकरणात तडीपार होते. हे प्रकरण देशभक्तीचे लक्षण मानले जाईल, असे प्रत्युत्तर भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा हे गुजरातमधून तडीपार होते, असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. त्याला तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

दाऊदच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही, हे बहुदा पवार विसरले आहेत, अशी टिप्पणी तावडे यांनी केली. काळ्या पाण्याच्या किंवा दोन जन्मठेपेच्या शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर जर मंत्री झाले असते, तर त्यांच्याबाबतही पवार यांनी हेच वक्तव्य केले असते का? माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधानही झाले. त्यांचा उल्लेखही पवार यांनी याचप्रकारे केला असता का, हे त्यांनी जनतेला सांगावे, असे तावडे यांनी म्हटले आहे.

Story img Loader