लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये विशेष जलगदती न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवावे, तसेच त्यांच्यासाठी उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद केंद्र उभारावे, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.

Thane crime bhiwandi gangster sujit patil alias tatya arrested from igatpuri
१४ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात भिवंडीचा ‘तात्या’ अटकेत; खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला होता लोकसभेत विषय
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Police Commissioner Amitesh Kumars stance Committed to taking legal action against criminals
गुन्हेगारांना ‘अपवित्र’ करण्यासाठी कटिबद्ध, अमितेश कुमार यांची भूमिका
lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
pune crime news in marathi
Pune Crime News : बिबवेवाडीत टोळक्याकडून ५० हून अधिक वाहनांची तोडफोड
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
people of Pardhi community will get caste and birth certificate
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…

अभिनेता सैफ आली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले असून त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिम मतदारसंघातील आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

भारताची सीमा ओलांडून आलेले बांगलादेशी नागरिक मुंबईत बेकायदेशीररित्या स्थायिक झाल्याबद्दल साटम यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे. हे घुसखोर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. अलिकडचा सैफ अली खानवर झालेला हल्ला हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. साटम यांनी काही उपाययोजना सुचवल्या असून या उपाययोजना लागू केल्यास बांगलादेशी घुसखोरांमुळे होणारा धोका कमी होईल आणि मुंबई तसेच महाराष्ट्राचे सुरक्षितता आणि स्थैर्य वाढेल.

आमदार साटम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत –

१) घुसखोर बांगलादेशी नागरिकांसाठी उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद केंद्र उभारावे.
२) प्रमुख शहरांमध्ये विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवावे आणि निकालानंतर घुसखोरांना त्वरित देशाबाहेर पाठवावे.
३) पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) अधिनियम, १९५०, आणि परदेशी नागरिक अधिनियम, १९४६ मध्ये सुधारणा करून घुसखोरीसाठी कठोर शिक्षा व दंडाचे व्यवस्थापन करावे.

Story img Loader