मुंबई: शिवसेनेची पाळेमुळे ६२ वर्षांहून अधिक काळापासून घट्ट रुजलेली असून ती उघडय़ावर पडलेली नाहीत. त्यामुळे तिला घेऊन जाऊ शकतो अशा भ्रमात कोणी राहू नये. तसेच भाजपच्या कितीही ‘कुळय़ा’ आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा इशारा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा उल्लेन न करता  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विरोधकांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘साप्ताहिक मार्मिक’च्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे यांनी पुन्हा  राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने  घर घर तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम दिला आहे. पण ज्यांच्याकडे घरच नाही त्यांनी तिरंगा कुठे फडकवायचा, केवळ तिरंगा फडकवणाराच राष्ट्रभक्त होतो का, अशी विचारणा करीत ठाकरे यांनी या मोहिमेवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला असतानाच आपण परत गुलामगिरीकडे चाललो का अशी देशातील परिस्थिती आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी देशात केवळ भाजपच उरेल. शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपतील अशा आशयाचे केलेले व्यक्तव्य लोकशाहीला घातक आहे.   भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही, पण त्यांची ५२ असो वा १५२ कुळे आली तरी शिवसेना संपणार नाही, असा  टोलाही त्यांनी लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp not end shivsena uddhav thackeray warning ysh
First published on: 14-08-2022 at 00:52 IST