मुंबई : दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेत लोकसंख्यावाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी योग्य ठरवला. त्यामुळे प्रभागवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या तपशीलवार आदेशाची प्रत उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसंख्यावाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवून ती २२७ वरून २३६ करण्यास मंजुरी देणारा वटहुकूम राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार पालिकेच्या कायद्यातही बदल करण्यात आला. या दोन्हीला भाजप नगरसेवक अभिजीत सामंत आणि नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc rejects plea by bjp corporators against increase in bmc seats zws
First published on: 18-01-2022 at 03:59 IST