scorecardresearch

Premium

मुंबई: पोटनिवडणुका टाळण्याकडे पक्षांचा कल?

लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर ही जागा भरण्याकरिता सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे.

by election in pune
पोटनिवडणुका टाळण्याकडे पक्षांचा कल? ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यापाठोपाठ चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या असल्या तरी वर्षभरावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता भाजपसह काँग्रेसचीही दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होऊ नयेत अशीच इच्छा आहे.

लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर ही जागा भरण्याकरिता सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे. फक्त दोन गोष्टींसाठी त्याला अपवाद केला जाऊ शकतो. लोकसभा वा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असणे. दुसरा अपवाद हा केंद्र सरकारबरोबर सल्लामसलतीनंतर पोटनिवडणूक पुढील सहा महिन्यांत घेणे शक्य नाही याची निवडणूक आयोगाला खात्री पटणे. यात युद्धजन्य परिस्थिती, रोगराई, नैसर्गिक आपत्ती, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या कारणांमुळे पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद आहे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

विद्यमान १७व्या लोकसभेची मुदत १६ जून २०२४ला संपत आहे. धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन झाल्याने लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्ष १८ दिवस शिल्लक आहेत. याचाच अर्थ एक वर्षांच्या कालावधीपेक्षा १८ दिवस अधिक होतात. पुण्याची जागा २९ मार्चला रिक्त झाली. यामुळे २९ सप्टेंबपर्यंत पोटनिवडणूक होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारबरोबर सल्लामसलतीनंतर पोटनिवडणुका सहा महिन्यांच्या कालावधीत घेणे शक्य नाही, असे निवडणूक आयोगाचे मत झाल्यास पोटनिवडणुका टळू शकतील. पुण्यात पोटनिवडणूक होऊ नये अशी भाजपची इच्छा आहे. कारण पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का बसला होता. याशिवाय जातीय राजकारण भाजपला नडले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Both the bjp and the congress want no by elections in both the constituencies in pune mumbai amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×